पुणे : राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी शिवाजी खांडेकर यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अध्यादेश जारी करूनही अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. “परिणामी बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. त्यानंतरही संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे खांडेकर यांनी सांगितले.
Source link
Auto GoogleTranslater News
Post Views: 27





